Mirzaraje Jaysingh
-
- $4.99
-
- $4.99
Publisher Description
मुघलांनी चालवलेला प्रचंड नाश आणि त्यांचे अफाट विध्वंसक सामर्थ्य महाराजांना दिसत होते. शत्रुशी सतत बारा वर्षे आपली तुटपुंजी फौज लढते आहे. यावेळी आपण तह करून दोन पावले माघारच घ्यावी आणि बळ वाढवून पुन्हा उठाव करावा असा विचार महाराजांनी केला व त्यांनी मिर्झाराजांशी तहाची बोलणी लावली. तह झाला. त्यात मुख्यतः ठरले की ,तेवीस किल्ले महाराजांनी मुघलांना द्यावेत, संभााजीराजे यांना पाच हजारी मनसब मिळाली व दक्षिणेतील सुभेदारांना महाराजांनी लष्करी मदत करावी. साडेतीन महिने गेलेय मिर्झाराजेंनी महाराजांना आग्रह केला की, आपण औरंगजेब बादशहांना भेटावयास दरबारला चला. काही राजकीय फायदेच होतील. तोटा नाही. मी आणि माझा मुलगा रामसिंह जामीन राहू.